शहापूर ः धरणाच्या भिंतीतून अशी पाणी गळती होत आहे. pudhari photo
ठाणे

Bhatsa dam water leakage : भातसा धरणातून पाण्याची गळती

धरणाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

शहापूर (जि. ठाणे) : भातसा धरणाच्या मुख्य भिंतीतून व इतर ठिकाणाहून प्रति सेकंद 500 ते 700 लिटर पाण्याची गळती होत आहे. यावर योग्यवेळी दुरुस्तीचे उपाय न केल्यास भविष्यात धरणाच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई व उपनगरांचे जीवनदायी स्रोत असलेले भातसा धरण अलीकडच्या काळात पाणी गळतीच्या समस्येमुळे चर्चेत आले आहे. धरणाच्या विविध भागांतून पाण्याची झिरप सुरू असून, यामुळे धरणाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या धरणातून मुंबई महानगर पालिकेस दररोज 2,120 एमएलडी, तर ठाणे महानगर पालिकेला रोज 250 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT