आगीमुळे झालेले वाहनाचे नुकसान Pudhari Photo
ठाणे

ठाण्यामध्ये धावत्या चारचाकी वाहनाला आग

करण शिंदे

ठाणे : ठाण्यामधील तीन हात नाका येथे धावत्या चारचाकी वाहनाने पेट घेतल्याची घटना शनिवारी (दि.22) रात्री घडली . या वाहनामध्ये चालक आणि दोन प्रवासी प्रवास करत होते. प्रसंगावधान राखत चालक आणि प्रवाशांनी गाडीच्या बाहेर उड्या घेऊन आपला जीव वाचवला. भर रस्त्यात या कारने पेट घेतल्यामुळे मुंबईकडून ठाण्याकडे येणारी वाहतूक मात्र थोड्यावेळासाठी मंदावली होती.

मुंबईच्या शिवाजीनगर गोवंडी येथून चालक सय्यद मोहम्मद दोन प्रवाशांसह मुंब्र्याच्या दिशेने निघाले होते. तीन हात नाका उड्डाणपूल उतरल्यानंतर कालिका माता मंदिर जवळ अचानक मोहम्मद यांच्या गाडीने पेट घेतला. त्यांच्यासह दोघांनी गाडीबाहेर धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस, पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली कार रस्त्याच्या बाजूला उभी केली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT