सातारा

सातारा : वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा

Shambhuraj Pachindre

सातारा : पुढारी वृत्तसेवा निसर्गाचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या कडेकपारीत जंगलाची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वन्य प्राण्यांचा सुळसुळाट सुरु आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या त्रासामुळे डोंगरकपारीसह दऱ्याखोऱ्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. याविरोधात राजू (भैया) भोसले यांच्या नेतृत्वाखाली परळी भागातील शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला.

माजी जि. प. सदस्य राजु भैय्या भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह हजारो शेतकरी महिला,पुरूष सहभागी झाले होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT