सांगली

पंतप्रधान मोदी यांनी ‘सीएए’, ‘एनआरसी’ कायदा करून मोठे कार्य केले : धनंजय देसाई

अविनाश सुतार

विटा: पुढारी वृत्तसेवा :  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएए आणि एन आरसी कायदा करून मोठे कार्य केले आहे, असे प्रतिपादन हिंदू राष्ट्र सेनाप्रमुख धनंजय देसाई यांनी केले. सांगली जिल्ह्यातील विटा येथे सकल हिंदू समाज विटा शहर आणि खानापूर तालुक्याच्या वतीने हिंदू गर्जना महामोर्चा आज (दि.२४) काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

या मोर्चाचे संयोजन सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी केले. खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, किरण तारळेकर, दहावीर शितोळे, जगन्नाथ पाटील, नितीन जाधव आदीसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चाला श्री भैरवनाथ मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, ते मॉडर्न एज्युकेशन सोसायटी मार्गे साळशिंगे रस्त्यावरील चौंडेश्वरी मंदिरापर्यंत काढण्यात आला. येथे जाहीर सभेने मोर्चाची सांगता झाली.

यावेळी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना निवेदन देण्यात आले. यात लव जिहाद, सक्तीचे धर्मांतरण, गोवंश हत्या निर्बंध कायदा आणि वक्फ बोर्ड मान्यता रद्द करावी. आदी मागण्या केल्या आहेत. हिंदू जनजागृती समितीच्या धनंजय देसाई, हिंदू एकता संघटनेचे विक्रम पावसकर, धनश्री शिंदे आणि मेघना कदम यांची भाषणे झाली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT