सांगली : पुढारी वृत्तसेवा
मराठा आंदोलनाचा प्रश्न न सुटल्याने विधानसभेला सर्व ठिकाणी निवडणूक लढवण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यादृष्टीने अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे त्यांची जिल्ह्यातील अनेकांनी भेट घेऊन मुलाखती दिली. यामध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे, मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील, विशाल पाटील, प्रदीप पाटील आदींचा समावेश होता.
याबाबत युवराज शिंदे म्हणाले, जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी का? यासंदर्भात सर्वांना मते विचारली. त्यावर जिल्ह्यातील इच्छुकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बहुतेकांनी निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. रविवारी (दि. 20) निवडणुकीत लढायचे की पाडायचे? हा निर्णय घेतला जाणार आहे. सांगलीबाबतची सर्व माहिती मी त्यांना दिली आहे. यावेळी रामहरी ठोंबरे, शिवाजी जाधव, तानाजी पवार, मारुती खोत, नितीन पवार आदी उपस्थित होते.