रायगड : रायगडात होत असलेल्या 10 नगरपालिका निवडणूकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी छाननीप्रक्रिया पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात अर्ज माघारी नंतरच (21 नोव्हेेंबर) नेिवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. आपल्याला अडथळा ठरणाऱ्या उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी अधिकृत उमेदवारांकडून संबंधीतांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
रायगडात अलिबाग, पेण, उरण, कर्जत, माथेरान, खोपोली, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, महाड या नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील 10 नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बहुरंगी लढती अपेक्षित आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी 10 नगराध्यक्षपदांसाठी 59 तर नगरसेवकपदांसाठठी 900 अर्ज दाखल झालेले आहेत.मंगळवारी अर्जाची छाननी करण्यात आली.
यामध्ये डमी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.मात्र अजूनही काही नगरपालिकांतील प्रभागातील तिढा सुटलेला नाही.तो सुटावा यासाठी साम,दंड,भेद नितीही वापरली जात आहे.अर्ज माघारीचा अखेरचा दिवस 21 नोव्हेंबर हा आहे. अजून तीन दिवस शिल्लक असल्याने या उमेदवारांची मनधरणी करण्याचे काम नेतेमंडळींना करावे लागला आहे. त्यानंतर माघारीनंतरच निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. काँग्रेस, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, शेकाप, मनसे, रिपाइं, प्रहार या प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक आघाड्यांनीही अर्ज दाखल केलेले आहेत.
नगरपरिषदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठी 520 तर नगराध्यक्ष पदासाठी 36 असे एका दिवसात तब्बल 556 अर्ज दाखल झाल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. आतापर्यंत एकूण 59 नगराध्यक्ष पदांचे अर्ज आणि 900 नगरसेवक पदांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांमधून एकूण 217 सदस्य पदे निवडली जाणार आहेत. त्यासाठी आजपर्यंत 520 उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर एकूण 900 अर्जांची पडताळणी प्रक्रियाही करण्यात आली.अर्ज छाननीच्यावेळी सर्वच पक्षांचे उमेदवार,कार्यकर्ते मोठ्या संख्यांनी उपस्थित होते.