Kharif Seed Shortage Pudhari
रायगड

Kharif Seed Shortage: शेतकरी राजा बियाण्यांच्या प्रतीक्षेत; यंदाच्या खरीपासाठी अनुदानित स्वरूपात 16 हजार 950 टन बियाण्यांचे वितरण

मे महिना संपत आला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बियाणे उपलब्ध झालेले नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पुढारी वृत्तसेवा

संतोष उतेकर

सुधागडः रायगड जिल्ह्यात हरित हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात भोसरी असताना शेतकरी मात्र अद्याप बियाणांच्या प्रतीक्षेतआहे कृषी विभागाने यंदाच्या खारीपासाठी मोफत अथवा अनुदानित स्वरूपात 16 हजार950 टन बियाणांचे वितरण करण्याचे नियोजन केले आहे.

मे महिना संपत आला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बियाणे उपलब्ध झालेले नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

रायगड जिल्ह्यात दरवर्षी साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दूर वाफे पेरणी सुरुवात होत ते पावसाच्या हंगामापूर्वी शेतकरी बियाणे खते आणि शेताची मशागत यांची तयारी करून ठेवतात यंदाही मान्सून वेळेत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी सज्जे झाले आहे.

तरी बियाणांचा पुरवठा रखडल्याने नियोजन कोण म्हणल्याची भीती व्यक्त होत आहे याबाबत माहिती देताना रायगड कृषी विभागाचे उपसंचालक प्रवीण पिंगळे यांनी सांगितले की पोर्टल मधील नोंदणी येत्या आठवडाभरात सुरू होईल त्याबरोबर 188 परवानाधारक दुकानदारांना पैकी जास्तीत जास्त दुकानदाराकडे बियाणी उपलब्ध होतील.

अनुदानावर संभ्रम

अनुदानित बियाणे मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे यंदा या पोर्टलवर भादियानांच्या प्रवेश पहिल्यांदाच करण्यात आलेला आहे मात्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना नोंदणी करताना त्रास सहन करावा लागत आहे अनेकांना अर्ज पूर्ण करता येत नसल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे शंभर टक्के अनुदानावर बियाणे मिळेल की नाही याबाबतही संभ्रमांचे वातावरण निर्माण झाले आहे.

गटशेतीला प्राधान्य

जिल्ह्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे गट स्थापन करण्यात येत आहेत कृषी विभागाने यंदा गट गटशेतीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून शेतकरी गटांच्या माध्यमातून प्रथम येणाऱ्या सह प्रथम प्राधान्य या निकषावर बियाणे वाटप केले जाणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकरी गटात सहभागी नसल्या लहान व मध्यम शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.

पावसामुळे चिंता

मागील वर्षी 7 मे पासून पावसाने हजेरी लावली होती त्यानंतर काही भागात 25 वे पासून वाफे पेरणीला सुरुवात झाली होती पावसाच्या आणि मतीमुळे शेतकरी आगाऊ तयारी करत असतात मात्र यंदा खारीक हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बियाणे उपलब्ध नसल्याने झाल्याने शेतकरी चिंतेत असून कृषी विभागाने तातडीने बियाणे उपलब्ध करणे ग घ्यावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT