रायगड: ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या रायगड जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याचा सण अत्यंत प्राचीन परंपरेने आणि दिमाखात साजरा केला जात आहे.
यंदा जिल्ह्यात तब्बल १,९५६ सार्वजनिक आणि ६,९१४ खाजगी अशा एकूण ८,८७० दहीहंड्यांची उभारणी करण्यात येत असून सुरक्षा व्यवस्थेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यंदा रायगड जिल्ह्यात १,९५६ सार्वजनिक तर ६,९१४ खाजगी अशा एकूण ८,८७० दहीहंड्या उभारण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात एकूण ३२४ सार्वजनिक मिरवणुका आयोजित करण्यात आल्या आहेत.
यात म्हसळा (१०१ मिरवणुका), दिघी सागरी (५३ मिरवणुका), रोहा (३९ मिरवणुका), पोयनाड (२२ मिरवणुका) आणि पाली (१७ मिरवणुका) येथे ऐतिहासिक परंपरेनुसार भव्य मिरवणुका निघणार आहेत.