कोलाड: सद्या जुन महिना सुरु झाला असुन मासळीचा हंगाम अंतिम टप्यात आला असल्यामुळे सुक्या मासळीला अधिक मागणी वाढली आहे. पावसाळ्यासाठी सुखी मासळीची साठवण केली जाते. यामुळे सुक्या मासळीची मागणी वाढल्यामुळे सुक्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. पावसाळ्यात बेगमीसाठी ओल्या मासळी बरोबर सुक्या मासळीला मागणी वाढली आहे.
राज्यभरातून सुक्या मासळीला मागणी असते. त्यामुळे मासळीची मोठी बाजारपेठेत असलेल्या ठिकाणी सुकी मासळी सुकविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असुन जवला (सुकट ), बोंबील, मांदेली, कोळंबी, बांगडा, माकटी, अंबाड, मासेसुकट, ही बाजाराच्या ठिकाणी विक्रीसाठी आणले जात आहे.
परंतु येरवी कमी असणारे भाव एका किलो मागे डबल वाढले असल्याचे बाजारात पहावयास मिळत आहे. पावसाळ्यासाठी सुक्या मासळीची साठवण करण्यासाठी सुक्या मासळीची मागणी वाढल्यामुळे त्यांचे दर ही वाढले आहेत.