बारामती : पुढारी वृत्तसेवा: वटपौर्णिमेला मी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे अनेकांना पोटशूळ उठला. परंतु, मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले. बारामतीत अहिल्या विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, खडकवासला मतदारसंघात 29 ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. मी वटपौर्णिमेदिवशी केलेल्या पोस्टवरून काहींनी माझ्यावर धर्म बुडविल्याची टीका केली. मला सत्यवानाची सावित्री माहिती नाही. पण, जोतिबांची सावित्री माहिती आहे, अशी ती पोस्ट होती.
त्यावर आकाश-पाताळ एक करीत टीका करणार्यांनी स्वतःच्या घरात ते महिलेला किती सन्मान देतात, हे पाहावे, असा टोला चाकणकर यांनी लगावला. ते महिलांना सन्मान देत असते, तर सामूहिक बलात्कार, रस्त्यावर होणारे महिलांचे विनयभंग, हुंडाबळी असे प्रकार घडलेच नसते. असे प्रकार घडताना या मंडळींचा धर्म बुडत नाही का, असा सवाल त्यांनी केला.
हेही वाचा