वडगाव मावळ(पुणे) : पवन मावळातील बहुतांश गावे आधुनिक पद्धतीने शेती करीत असून, सुमारे 1500 हेक्टर क्षेत्रावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यांना चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळेल, अशी खात्री कृषी विभागाच्या वतीने देण्यात येत आहे.
पाऊस सुरू झाल्याने लागवडीला वेग
जून महिना व जुलैचा पाहिला आठवडा पावसाने ओढ दिल्याने पावसाअभावी भात लागवडी खोळबल्या होत्या. परंतु, आता पाऊस चांगला सुरू झाल्याने शेतकर्यांनी भात लागवड दोरीच्या साह्याने 15 बाय 25 सेंमी अंतरावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे. शिळींब, मोरवे, चावसर, मळवंडीठुले, काले, महागाव, येळसे आजीवली, ब्राह्मनोली, वारू परिसरात चारसूत्री लागवड सुरू आहे. यावर्षी चांगले उत्पन्न मिळण्याची आशा शेतकर्यांना आहे.
लागवडीनंतर यूरिया ब्रिकेट खत गोळ्याचा वापर चार चुडाच्यामधे एक गोळी अशा प्रकारे लागवडीनंतर दोन ते तीन दिवसांत लावणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भाताच्या उत्पादनात वाढ होणार आहे. दरवर्षीच मजुराचा तुटवडा, उशीरा होणारा पाऊस, तरुण वर्गाचा निरउत्साह त्यामुळे भात शेती परवडत नव्हती. परंतु, आता कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे शेतकरी आधुनिक लागवडीकडे वळले आहेत. यावर्षी बहुसंख्य शेतकरी चारसुत्री पद्धत, एसआरटी, यांत्रिकीकरण भात लागवडी करत आहेत.
शेतकरी भात लावणी करताना दोन ते तीनच भातरोपे लावत आहेत. कमी रोपे लागत असल्यामुळे ही पद्धत शेतकरी मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. आजीवली शिळींब, मोरवे, मोरवे,काले, वारू, ब्राह्मनोली, ठाकुरसाई मळवंडीठुले, काले, महागाव, येळसे, सावंतवाडी, प्रभाचीवाडी,चावसर, केवरे, कोथुरणे ढालेवाडी, मालेवाडी, कढधे, भडवली आदी गावांमध्ये सुमारे 1500 हेक्टर क्षेत्रावर चारसूत्री भात लागवड पूर्ण झाली आहे.
– प्रशांत डहाळे, मंडळ कृषी अधिकारी
यावर्षी पावसाने जून महिना व जुलैचा पाहिल्या आठवड्यामध्ये खंड दिल्याने रोपवाटिका उशिरा उगवल्या होत्या. त्यामुळे भात लावण्या सुरू होण्यास उशीर झाला. आता जोरदार पाऊस पडत असल्याने पवन मावळच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडी जोरात सुरू असून, त्या अंतिम टप्प्यात आहेत. शेतकरी चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्याकडे आकर्षित झाले आहेत. शेतकर्यांनी एक रुपयात पीक विमाही भरावा.
– विकास गोसावी, कृषी सहायक, काले
हेही वाचा