पुणे : पुढारी वृत्तसेवा : येत्या खरीप हंगामात राज्यात 147 लाख 77 हजार हेक्टरवरील पेरण्यांचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बियाण्यांपेक्षा सहा लाख क्विंटलने बियाण्यांची अधिक उपलब्धता शेतकर्यांना करून देण्यात येत आहे.
याबाबत कृषी आयुक्तालयातील संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) विकास पाटील माहिती देताना म्हणाले, खरिपात बियाण्यांची सुमारे 19 लाख 28 हजार क्विंटलइतकी आवश्यकता आहे. त्यापेक्षा अधिक म्हणजे जवळपास 25 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.
बियाण्यांच्या पुरवठ्यामध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून (महाबीज) 3.76 लाख क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळ (एनएससी) 59 हजार क्विंटल, खासगी बियाणे कंपन्यांकडून सुमारे 20 लाख 65 हजार क्विंटल मिळून 25 लाख क्विंटल बियाण्यांच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामात सोयाबीनव्यतिरिक्त भुईमूग शेंग पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.
त्यानुसार राज्यात भुईमूग पिकाची सुमारे दोन लाख 50 हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी 10 हजार क्विंटल इतक्या बियाण्यांची गरज आहे. महाबीजकडून एक हजार 625 क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून दोन हजार क्विंटल आणि खासगी कंपन्यांकडून आठ हजार 657 क्विंटल मिळून गरजेपेक्षा अधिक म्हणजे 12 हजार 282 क्विंटल इतके भुईमुगाचे बियाणे उपलब्धतेचे नियोजन कृषी विभागाने केल्याचे पाटील यांनी सांगितले.
खरीप हंगामातील प्रमुख पिकांखालील क्षेत्र (लाख हेक्टर),बियाणे उपलब्धता (लाख क्विंटलमध्ये)
बियाणे क्षेत्र बियाणे उपलब्धता
सोयाबीन 50.70 13.31 18.46
तूर, मूग, उडीद 19.00 0.82 0.91
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.