नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे शेततळ्यात बुडून दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी (दि. २८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृत मुलांची नावे सोहम जयसिंग नवले (वय १२) आणि अभि महेश पवार (वय १०) अशी असल्याचे समजते. गाडेकर यांच्या शेतातील तळ्यात ही दुर्घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा आणि रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून संबंधित मुलांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी लहान मुलांनी शेततळे किंवा पाण्याच्या साठ्यांमध्ये अंघोळीसाठी जाणे टाळावे, पालकांनी याबाबतची काळजी घ्यावी, असे आवाहन सुधीर महाराज घोलप यांनी केले आहे.