पुणे: राज्यासह देशात पुढील काही दिवसांत बहुतांश भागात कमाल तसेच किमान तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सध्या हिमालयात लागोपाठ दोन पश्चिमी चक्रावात धडकणार आहेत. त्याच्या प्रभावामुळे हिमालयाच्या कुशीतील राज्यात बर्फवृष्टी व पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. यामुळे दक्षिण भारतातील काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. दरम्यान, 19 फेबुवारीपर्यंत पूर्व किनारपट्टी, मध्य भारत, दक्षिण भारतात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.
त्यानंतर 20 ते 26 फेबुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, विदर्भ, तेलंगणा, उत्तर कर्नाटकात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहू शकते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक किनारपट्टी तसेच उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रातील किमान तसेच कमाल तापमान पुढील काही दिवसांत वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.