पुणे

अखेर त्या दोन्ही शेतकऱ्यांचे मृतदेह काढले बाहेर

Laxman Dhenge

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा : काझड(ता.इंदापूर) येथील निरा भिमा जल स्थिरीकरण प्रकल्पाच्या बोगद्याच्या विहिरीमध्ये बुधवारी(दि 22) सायंकाळी पडलेल्या दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह रात्री बारा वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेमध्ये रतिलाल बलभीम नरुटे( वय 50) अनिल बापूराव नरुटे (वय 30) दोघे राहणार सिद्धेश्वर वस्ती काझड या दोघांचा मृत्यू झाला आहे.

बोगद्याच्या विहिरीची खोली सुमारे 300 फूट असल्यामुळे मोठी क्रेन आणून हे मृतदेह क्रेनच्या साह्याने वर काढण्यात आले आहेत या दोन्ही शेतकऱ्यांवर गुरुवारी सकाळी अंत्यविधी करण्यात आला

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT