पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय लष्कराने खेळासह भारतीय समाजाच्या सर्वच क्षेत्रांत योगदान दिले आहे आणि याचा मला अभिमान वाटतो. तसाच मला असाही विश्वास आहे की, भारतीय लष्कर हे तुमचे आहे आणि तुम्हाला त्याचा अभिमान वाटायला हवा. मुरलीकांत पेटकरांची कामगिरी ही प्रत्येकांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांनी दाखवलेला दृढनिश्चय आणि चिकाटी ही प्रत्येकाने अभ्यासली पाहिजे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी केले.
महाराष्ट्र दि स्पोर्ट् क्लाइंबिग संघटनेच्या वतीने आयोजित भारताला पहिले पॅरिलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणार्या मुरलीकांत पेटकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पहिल्या सुवर्णपदकाच्या 51 व्या वर्षानिमित्त या सत्कार सोहळ्याचे आजोयन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मेजर जनरल आरएस सुंदरम, एस. तालुजा, सुधीर मोरे, कर्ना (निवृत्त) बार्गव, संधी, डॉ. मिलिंद कसबेकर, राज चौधरी, शंकुतला खटावकर, संघटनेचे अध्यक्ष बि—गेडियर (निवृत्त) एम. पी. यादव, खजिनदार प्राजक्ता घोडके आदि उपस्थित होते.
मुरलीकांत पेटकर 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात जखमी झाले होते. ते त्यापूर्वी चांगले खेळाडू होते आणि जखमी झाल्यावरही त्यांनी पॅरा खेळाडू म्हणून आपला प्रवास चालू ठेवला. जलतरणात त्यांना सात आंतरराष्ट्रीय पदके मिळाली. पेटकर यांनी भालाफेक, अचूक भालाफेक आणि स्लॅलम या खेळातही सहभाग घेतला होता. पेटकर यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत 50 मीटर फ—ी-स्टाईल जलतरणात 37.33 सेकंदांच्या जागतिक विक्रमासह सुवर्णपदक मिळविले होते. या वेळी राज्यातील पॅरालिम्पिक खेळाडूसाठी मिळणारा पहिला शिवछत्रपती पुरस्कारही पेटकर यांना मिळाला होता.
हेही वाचा