मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
देशभर चर्चेत राहिलेल्या नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर रद्द करण्यात आलेली पुनर्परीक्षा रविवारी (दि. २१) मालेगावातील तीन केंद्रांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शांततेत पार पडली. तिन्ही केंद्रांमध्ये मिळून २,०५१ विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली होती.
मसगा महाविद्यालयात ७३१, महिला महाविद्यालयात ६०० आणि एटीटी हायस्कूलमध्ये ७२० विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्राच्या १०० मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता.
तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांची सखोल तपासणी व स्कॅनिंग करूनच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. सर्व केंद्रांमध्ये सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली परीक्षा प्रक्रिया पार पडली.
प्रश्नपत्रिका राष्ट्रीयीकृत बँकांच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. परीक्षेपूर्वी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ, तहसीलदार विशाल सोनवणे आणि नीटचे अधिकारी जी. एन. जोशी शिक्षा यांनी परीक्षा केंद्रांची बे, पाहणी करून तयारीचा आढावा घेतला होता. सदरामय काटेकोर सुरक्षा व्यवस्था, कठोर तपासणी आणि प्रशासनाच्या सतर्क देखरेखीमुळे पुनर्परीक्षा कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीतपणे पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली.