येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; कृषि उत्पन्न बाजार समिती येवला आवारामध्ये मापारी आणि व्यापारी यांच्यातील वादामुळे सुमारे दीड दोन कांदा लिलाव ठप्प पडले आहेत. व्यापारी आणि मापारी यांच्या मध्ये वादामुळे लिलाव ठप्प झाल्याची माहिती पुढे येत असून व्यापारी व मापारी प्रतिनिधी यांची बैठक सभापती किसान धनगे यांच्या दालनात सुरू आहे. (Nashik News)
सकाळी लीलाव सुरू झाल्यावर पंधरा-वीस मिनिटांत झालेल्या या वादामुळे कांदा विक्रीसाठी आलेले शेतकरी त्रस्त झाले आहे.
हेही वाचा :