मनमाड : परतीच्या पावसामुळे आठवडी बाजारात पसरलेला शुकशुकाट. Pudhari News Network
नाशिक

Monsoon Return Manmad : मनमाडला झोडपले, नागरिकांची तारांबळ

आठवडे बाजारासाठी आलेल्या नागरिकांसह व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ

पुढारी वृत्तसेवा

मनमाड (नाशिक) : शहरात रविवार (दि. २१) परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. सायंकाळी ४ वाजेनंतर सुरू झालेल्या पावसाने आठवडे बाजारासाठी आलेल्या नागरिकांसह व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसाने पिकांना फटका बसत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, सलग पाऊस होत असला तरी उकाडा मात्र कायम आहे. मे महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर सलग झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, तूर, कपाशी, कांदा पिकाची लागवड केली. दमदार पावसामुळे पिके देखील जोमात आली. मात्र गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. रविवारी (दि. २१) आठवडी बाजारही पाण्यात गेल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT