नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
वज्रेश्वरीनगरला चौघांनी मिळून युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणाची कुरापत काढून चौघांनी मिळून रविवारी (दि.5) रात्री कुणाल उर्फ दादू विजय थोरात (25, रा. एरंडवाडी) याच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे.
नीलेश राजेंद्र थोरात (37, रा. एरंडवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सोनू भिका मोरे, गोपाळ जाधव, विकी उत्तम वाघ, शुभम बनकर यांनी कुरापत काढून दांडा व दगडाने मारहाण करीत कुणालला गंभीर जखमी केले. घटनेनंतर संशयित पसार झाले होते. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.