जळगाव

जळगावातील शेती | जून महिन्याची चाहूल, खरिपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – शहराचा पारा चाळीस पार झाला असून तापमान 47 अंशावर गेलेले असताना अंगाची लाही लाही होत आहे. अशा कडक उन्हाळ्याचे चटके सहन करत बळीराजा मात्र जून महिन्याची चाहूल लागताच पुन्हा आपल्या खरीप हंगामाच्या तयारीला जोमाने कामाला लागलेला दिसून येत आहे. शेतातील नांगरणी व वखरणी पूर्ण केलेली असून शेतात जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत व तलावातील गाळ टाकण्याच्या कामाला वेग आला आहे. खंडाळा गावातील तलावाच्या तळ दिसू लागला आहे.

जळगाव जिल्ह्यातील तापमान 47 अंशावर गेलेले असताना शेतकरी आपल्या खरीप हंगामाची तयारीला लागलेला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतात मध्ये नांगरणी व वखरणी करून शेत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जमिन वखरणी करुन झाल्यानंतर मातीला उन खाण्यासाठी सोडून दिलेली आहे. शेतक-याची कामाची लगबग दिसून येत आहे. शेतातील काडी कचरा वेसनाच्या कामाला वेग दिलेला आहे. तर दुसरीकडे शेतात शेणखत टाकले जात आहे.  तलावातील गाळ काढून तो शेतात टाकण्याचे काम सुरू झालेले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार केरळमध्ये 30 जून रोजी मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 30 जूनच्या आधी कामे उरकून घेण्याचा लगबग लावलेली आहे. गेल्या वेळेस अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबडले मोडलेले असतानाही शेतकऱ्यांनी पुन्हा खरिपाच्या तयारीला जोर धरलेला आहे. यावेळेस पाऊस लवकर येण्याची शक्यता असल्याने शेतकरी आपली तयारी पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT