उत्तर महाराष्ट्र

जळगाव: भरधाव चारचाकीचा अपघात; एक ठार, चौघे जखमी

अंजली राऊत

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : चोपडाकडे जात असलेल्या भरधाव चारचाकी वाहनचालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला तर इतर चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवाशी पाच तरूण (एमएच १२ एफवाय ०९८८) धरणगावकडून चोपडाकडे जात असतांना वाहनचालक भैय्या मधूकर बारी (२४, रा. शेंदुर्णी ता. जामनेर) याचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात वाहनचालक बारी हा जागीच ठार झाला आहे. तर इतर अनिल विठ्ठल बारी (२४), प्रसाद रामदास गुरव (१९), मोना सुनील चौधरी (१८), सुभाष रामलाल भगत (१९, सर्व रा. शेंदुर्णी ता. जामनेर) चौघे गंभीर जखमी झाले आहेत. धरणगाव तालुक्यातील नांदेड व रोटवद दरम्यानच्या रस्त्यावर हा अपघात घडला आहे. जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. मयताचा मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला असून अपघातातबाबत अद्याप पोलिसात नोंद करण्यात आलेली नाही.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT