उत्तर महाराष्ट्र

जळगाव : कपाशीला फवारणी करताना विषबाधा होऊन शेतकऱ्याचा मृत्यू

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शेतात कापसाला फवारणी करताना विषबाधा झालेल्या धामणगाव येथील तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत बुधवार (दि.१२) रात्री उशिरा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशोक ज्ञानेश्वर सपकाळे (३५, रा. धामणगाव, ता. जि. जळगाव) असे मयत झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक सपकाळे हा आई-वडील, पत्नी व दोन मुलं यांच्यासह धामणगाव येथे वास्तव्याला होता. शेती करून आपला परिवाराचा उदनिर्वाह चालवीत होता. त्यांच्या धामणगाव शिवारातील शेतात यंदा त्यांनी कापसाची लागवड केली होती. बुधवार,दि. १२ रोजी दुपारी कापसाला औषध फवारणीचे काम सुरू होते. त्यावेळी अशोक सपकाळे याला फवारणी करताना विषबाधा झाली. अत्यवस्थ वाटायला लागल्याने आई व पत्नी यांनी तातडीने अशोकला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान सायंकाळी ५ वाजता अशोकचा मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई लताबाई, पत्नी सुनंदा, मुलगी भूमिका, मुलगा वैभव, आणि महेंद्र व किशोर हे दोन भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT