उत्तर महाराष्ट्र

जळगाव : धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजीनगरातील स्मशानभूमीजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने श्रीकृष्णनगरातील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

येथील सागर अरुण सरोदे (३०, श्रीकृष्णनगर) हा गुरुवारी (दि.३) पहाटे कोणालाही काहीही न सांगता निघून गेला. सकाळी ८.३० च्या सुमारास शिवाजीनगरातील स्मशानभूमीजवळील रेल्वे रुळावर सागरचा मृतदेह आढळून आला. जळगाव रेल्वे पोलिसांकडून सागरची ओळख पटविण्यात आली. खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला. सागरच्या पश्चात आई उषाबाई, वडील अरुण नथ्थू सरोदे, मोठा भाऊ हर्षल आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल रामराय इंगळे आणि पोलिस कॉन्स्टेबल किशोर पाटील पुढील तपास करीत आहेत.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT