धुळे : पुढारी वृत्तसेवा-धुळे जिल्ह्यातून यावर्षी देखील बारावीच्या परीक्षेत मुलींनीच अव्वल राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे. धुळे जिल्ह्याचा निकाल 93.02 टक्के लागला असून जिल्ह्यातून विद्यार्थिनींचा 94.96 टक्के निकाल लागला आहे. तर यंदा 91.53 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.
धुळे जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेसाठी 24321 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात दहा हजार 582 विद्यार्थिनीं तर 13739 विद्यार्थी यांनी नोंदणी केली होती. यातून 13665 विद्यार्थी तर 10506 विद्यार्थिनी असे 24171 परीक्षार्थींनी परीक्षेत सहभाग नोंदवला. यापैकी 12508 मुले तर 9967 मुली अशा 22 हजार 485 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण मध्ये मुलांचे प्रमाण 91.53 टक्के असून विद्यार्थिनींचे प्रमाण 9496 टक्के असे आहे. या वर्षी देखील विद्यार्थिनी या सरस राहिल्या असून जिल्ह्यातून एकूण 93.52 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात शिरपूर तालुक्याचा सर्वाधिक 97.27 टक्के निकाल लागला असून सर्वाधिक कमी धुळे ग्रामीण मधून 89.96 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. धुळे शहरातून 94.12 टक्के, साक्री तालुक्यातून 95.18 टक्के, शिंदखेडा तालुक्यातून ९१.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
हेही वाचा –