Ajit Pawar death:
मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या दुःखद परिस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कोणत्याही प्रचार सभा किंवा रोड शो न घेण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांना आता सभा किंवा मोठ्या रॅली काढता येणार नाहीत. त्याऐवजी, केवळ घरोघरी जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवण्याचे निर्देश पक्षाने दिले आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी विमानाने जात असताना अजित पवार यांचे अकाली निधन झाले, ज्यामुळे पक्ष आणि राज्याला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीसाठी केवळ सात दिवस शिल्लक असताना हा निर्णय घेण्यात आला असून, ही कृती अजित पवार यांना एक प्रकारे श्रद्धांजली वाहण्यासारखी आहे, असे मानले जात आहे. उमेदवारांसमोर आता केवळ पत्रकाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान आहे. निवडणुकीत उमेदवार निवडून आल्यानंतरही कोणतीही विजयी मिरवणूक काढली जाणार नाही, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.