मुंबईला साथीच्या आजारांचा विळखा pudhari photo
मुंबई

Mumbai health crisis : मुंबईला साथीच्या आजारांचा विळखा

डेंग्यूचे सर्वाधिक 979 रुग्ण; तर मलेरियाचे 840 रुग्ण वाढले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात रुग्णसंख्या कमी झाली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून कधी मुसळधार, कधी संततधार पाऊस सुरू असल्याने साथीच्या आजार वाढले. परिणामी, रूग्णसंख्या वाढली. डेंग्यूची रूग्णसंख्या दुप्पटीने वाढली आहे. यामध्ये डेंग्यूचे सर्वाधिक 979 रुग्ण सापडले तर मलेरियाचे 840, लेप्टोचे 52, चिकनगुनियाचे 86, हेपेटायटीस 73 रुग्ण , गॅस्ट्रोचे 229 रुग्ण सापडले आहेत.

मुसळधार पाऊस आणि त्यानंतर उघडीप यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजारांच्या वाढीसाठी वातावरण तयार झाल्याने रूग्णसंख्या वाढली आहे. सप्टेंबरमध्ये रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. पावसाने हजेरी लावल्याने रूग्णसंख्या वाढली आहे. ताप आल्यास महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र, दवाखाना, बाळासाहेब ठाकरे आपला रुग्णालयामध्ये जाऊन त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT