मुंबई : मुंबईत क्लीनअप मार्शल सेवा बंद झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणारे मोकाट सुटले होते. त्यावर जरब बसावी म्हणून प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली असून आता सार्वजनिक स्थळी थुंकल्यास 250 तर कचरा टाकल्यास 500 रूपये दंड आकारण्यात येणार आहे.
2006 साली पालिका प्रशासनाने याबाबत नियमावली जाहीर केली होती. यातील दंडाच्या रक्कतेम वाढ करीत आता ही नवीन नियमावली जाहीर केली असून पालिका कर्मचाऱ्यांवरच याची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबईत क्लीनअप मार्शल ही योजना सुरू होती. योजना चांगली होती, मात्र योजनेच्या नावाखाली वसुली सुरू झाल्याने ती बदनाम झाली आणि योजना बंद करण्यात आली. मात्र यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता हा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिकेने दंडाची रक्कम वाढवत नवीन नियम जाहीर केले आहेत. या अंतर्गत, सार्वजनिक स्थळी थुंकल्यास 250, कचरा टाकल्यास 500, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास 200, विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास 25 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
होणारा दंड असा (रुपयांमध्ये)
कचरा टाकणे : 500
थुंकणे : 250
आंघोळ : 300
लघवी करणे : 500
शौच करणे : 500
प्राणी किंवा पक्ष्यांना खाद्य : 500
भांडी, कपडे धुणे : 300
वाहन धुणे : 500
अंगण अस्वच्छ : 500
एकत्रित कचरा : 200
कचरा निर्मिती : 1000
राडारोडा : 20,000
मांसविषयक कचरा : 750
फेरीवाल्यांसाठी : 750