मुंबई

12th Exam Form Deadline : बारावी परीक्षा अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

उपमुख्यमंत्री शिंदे यांचे शिक्षणमंत्र्यांना निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले होते. बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षा अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर 2025 रोजी शेवटची मुदत देण्यात आली होती.

तथापि, मराठवाड्यासह नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर आदी ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT