पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्यात हवेचा दाब वाढल्याने गेले काही दिवस थांबलेला पाऊस पुन्हा अचानक सक्रिय झाला आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आगामी चार दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शनिवारी हवामान विभागाने गणेश विसर्जनाला पाऊस राहणार नाही, असा अंदाज वर्तवला होता. वातावरणातील शुष्कता जाणवू लागलेली असताना रविवारी सकाळी पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनच्या वाऱ्यांना पुन्हा गती मिळाली आहे.
त्यामुळे राज्यात १६ ते १९ सप्टेंबर या चार दिवसांत हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा नवा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकणात १६ ते १८ सप्टेंबर, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात १७ व १८ रोजी अधिक असणार आहे.