मराठवाडा

लोकसभेसाठी छत्रपती संभाजीनगर, हिंगोलीमध्ये भाजपला पोषक वातावरण; केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांचा विश्वास

backup backup

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसारखी स्थिती लोकसभा निवडणूकीत होणार नाही. उलट देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्ता यावी, यासाठी मतदारच आग्रही आहेत. हिंगोली, छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यात हेच चित्र दिसले असून या लोकसभा मतदार संघात भाजपसाठी पोषक वातावरण असल्याचा विश्वास रविवारी (दि.११) छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेले भाजपचे नेते तथा केंद्रीय कामगारमंत्री भुपेंद्र यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना व्यक्त केला.
यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, उत्तराखंडच्या खासदार कल्पना सैनी, आमदार प्रशांत बंब, भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरिष बोराळकर, समीर राजूकरकर यांची उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेत यादव म्हणाले, भाजपने देशात मोठ्याप्रमाणात विकास कामे केली आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी पक्षाला चांगले वातावरण दिसत आहे. पहिल्यापेक्षा अधिक बहुमताने मोदी सरकार सत्तेत येईल, असे दावा देखील त्यांनी केला. तसेच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास कामे सुरू असल्याने चांगले चित्र असल्याचेही ते म्हणाले. मात्र, भाजपने शिंदे गटाच्या आमदार, खासदारांच्या मतदार संघातही संघटन बळकटीवर लक्ष केंद्रीत केल्याने नाराजीचे सूर ऐकावसाय येत आहे, या प्रश्नाचे उत्तर देतांना ते म्हणाले की, भाजपचा नाराच मुळात सबका साथ, सबका विकास असा आहे. त्यामुळे पक्षाने नेहमीच आपल्या मित्र पक्षालासोबत घेत काम केले आहे. परंतु, उद्धव ठाकरेंनीच आम्हालासोडून कॉंग्रेससोबतच हात मिळवणी केली.

दरम्यान, भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपचा मित्र पक्ष असेल अशी चर्चा आहे. यावर यादव यांनी स्मित हास्य देत, ते तर आम्हाला पराभूत करण्यास निघाले, असे म्हणत अधिक बोलणे टाळले. तसेच खासदार संजय राऊत यांनी महिनाभरात सरकार कोसळले, असा दावा केला आहे, यावर यादव म्हणले राऊत हे भविष्यवक्ता आहे. परंतु, त्यांचे हे भविष्य चूकीचे ठरेल. सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकार जनतेच्या विकासाची कामे करीत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजप-शिवसेनेचीच सत्ता येणार आहे. सध्या विविध मतदार संघात जाऊन आपण मोदी सरकारने नऊ वर्षांच्या कार्यकाळा केलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेला देत आहेत, त्यानिमित्ताने आपण शनिवारी हिंगोलीचा दौरा केला. तेथूनच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्याचे त्यांनी सांगितले. या दौऱ्यात हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात जनता पुन्हा विकासाला गती देण्यासाठी भाजपासोबत असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, उमेदवार कोण असेल हे पक्षाची कोअर कमिटीच ठरवेल.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT