मानवत, पुढारी वृत्तसेवा : येथील नारायणनगर भागातील एका १७ वर्षीय कॉलेज तरुणास फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मंगळवारी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या वडिलांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अथर्व रंगनाथ कोंडगिर (वय १७) असे संबंधित तरूणाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील नारायणनगर भागातील तरुण अथर्व रंगनाथ कोंडगिर (वय १७) हा युवक शहरातील केकेएम महाविद्यालयात इयत्ता १२ वीमध्ये शिकत आहे. तो रोज सकाळी ९ वाजता कॉलेजला जातो आणि दुपारी १२.३० वाजता कॉलेजला जातो म्हणून घरातून गेला. परंतु, दुपारी २ वाजल्यानंतरही घरी न आल्याने त्याचे नातेवाईकांनी कॉलेजमध्ये चौकशी केली, मात्र, कॉलेजमध्ये तो नसल्याचे समजले. तसेच यावेळी मित्रांकडे आणि इतर नातेवाईकांकडे चौकशी करुनही तो सापडत नसल्याने अथर्व कोंडगिर याचे वडिल रंगनाथ कोंडगिर यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी अज्ञान इसमाने पळवून नेले, असल्याचा दावाही केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश स्वामी करीत आहेत.