आखाडा बाळापूर (हिंगोली); पुढारी वृत्तसेवा : जीवघेण्याच्या उद्देशाने तिघांकडून करण्यात आलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या ५० वर्षाच्या व्यक्तीचा पुणे येथे उपचारास घेऊन जाताना गुरुवारी (दि.६) वाटेत मृत्यू झाला होता. जखमी व्यक्तीवर तिघांनी ३० मार्च रोजी हल्ला केला होता. या प्रकरणी तिघा मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे घडली होती. फिर्यादी विष्णू प्रकाश जाधव (वय २४) तक्रारीवरून तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रामेश्वर तांडा तालुका कळमनुरी (जि. हिंगोली) येथे वामन सदाशिव जाधव (वय ५०) यांना ३० मार्च रोजी तीन जणांनी एका जागी नेऊन डोक्यावर आणि छातीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करत जखमी केले. दरम्यान जखमी वामन जाधव यांच्यावर स्थानिक रुग्णालायात उपचार सुरु होते. प्रकृती अधिक बिघडल्याने पुढील उपचारा करिता वामन जाधव यांना पुणे येथे घेऊन जात असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. फिर्यादी विष्णू जाधव यांच्या तक्रारीवरुन हल्लेखोर संजय बापूराव जाधव (वय ५०), पुंजा संजय जाधव आणि अविनाश शिवराम जाधव (तिघे रा. रामेश्वर तांडा) यांच्यावर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड व त्यांचे सहकारी करीत आहेत.
अधिक वाचा :