शंकरनगर : गलूर-नांदेड महामार्गावर बिलोली तालुक्यातील अटकळी शिवारात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. राजाराम मारोती चंदावाड (वय ६२, रा. राजुरा (बु) ता.मुखेड) असे अपघातातील मृताचे नाव आहे.
मुखेड तालुक्यातील राजुरा (बु) येथील रहिवासी राजाराम चंदावाड व बाबू सावकार हे गुरुवारी दुपारी दुचाकी क्र. (एम.एच. १२, एच.के.२८१४) वरून देगलूर मार्गे बिलोली तालुक्यातील बडूर येथे एका अंत्यविधीसाठी जात होते. दुसरी दुचाकी (क्र. के.ए.३८, एक्स ३५७४) या दुचाकीवरून दोघे नांदेडकडून देगलूरकडे जात होते. यादरम्यान बिलोली तालुक्यातील अटकळी शिवारात असलेल्या सेवा पेट्रोलपंपजवळ आले असता ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक बसली. या अपघातात देगलूर पंचायत समितीचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक राजाराम चंदावाड यांचा मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले बाबू सावकार व दुसऱ्या दुचाकीवरील दोघे असे एकूण तिघेजण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती रामतीर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना देगलूर येथे उपचारासाठी पाठवले.