Nanded Airport 'MADC'
नांदेड, पुढारी वृत्तसेवा मागील महिन्यात येथील विमानतळ एमआयडीसीकडून एमएडीसीकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सोमवारी (दि. २३) ही प्रक्रिया पार पडली. यामुळे विमानतळ नुतणीकरणासह नांदेड मुंबई विमानसे-वेचा आशा उंचावल्या आहेत.
येथील विमानतळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाने बांधून ते रिलायन्स कंपनीकडे चालविण्यासाठी दिले होते. मागील सुमारे एक तपापासून विमानतळाचे व्यवस्थापन सदर कंपनी सांभाळत होती. परंतु त्याबाबत सातत्याने तक्रारी वाढत गेल्या.
हा विषय राज्याच्या विधानसभेतही गाजला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर निवेदन केले होते. आता त्यांच्या दुसया टर्ममध्ये विमानतळ व्यवस्थापन रिलायन्स कंपनीकडून काढून घेण्यात आले आहे.
दरम्यान महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी ही काही वर्षापूर्वी मुद्दाम राज्यातील विमानतळाच्या विकासासाठीच स्थापन करण्यात आली होती. त्याकडे आता विमानतळाचे हस्तांतरण झाले आहे. यासाठी मागील महिन्यात दि. १८ रोजी एमएडीसीच्या संचालक स्वाती पांडे, सहसंचालक डॉ. निशीकांत देशपांडे व अन्य अधिकारी नांदेड येथे प्रत्यक्ष येऊन पाहणी करून गेले.
त्यानंतर सोमवारी एमएडीसीचे सहसंचालक डॉ. निशीकांत देशपांडे आपल्या टीमसह आले होते. यावेळी प्रत्यक्ष रितसर हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली. यावेळी एमएडीसीचे कार्यकारी अभियंता कल्पेश लोहीवाल, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजाराम गुठळे, एअरपोर्ट डायरेक्टर राजेश पौडवाल आदी उपस्थित होते.
नांदेड विमानतळाचे आता मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या एमएडीसीकडे हस्तांतरण झाले. या वृत्ताला सहसंचालक डॉ. निशीकांत देशपांडे यांनी दुजोरा दिला. यापुढे विमानतळ नुतनीकरण, धावपट्टीची दुस्ती यासह नवीन सेवा सुरु करण्यावर आमचा भर असणार आहे. नांदेड शहर देशातील विविध महत्त्वाच्या शहरांना जोडले जाईल, असा एमएडीसीचा प्रयत्न असेल. नांदेड - मुंबई सेवा सुद्धा लवकरच सुरु होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.