जालना : कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना येथे मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी विविध शेतमालाची एकूण 12 हजार 910 क्विंटल आवक झाली. आजच्या बाजारात तूर, कापूस, सोयाबीन व हरभरा या प्रमुख पिकांना समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासा दिसून आला.
कापूस (सी.सी.आय.) ला क्विंटलमागे कमाल 8,010 रुपये, तर खाजगी कापसाला 7,360 रुपये दर मिळाला. तुरीच्या पांढऱ्या जातीस 8,480 रुपये कमाल, लाल तुरीस 8,302 रुपये, तर काळ्या तुरीस 8,350 रुपये दर नोंदविण्यात आला.
सोयाबीनला 5,500 रुपये कमाल व 5,200 रुपये सरासरी दर मिळाला. हरभरा (गावरान) ला 5,380 रुपये, तर गहू 2,675 रुपये कमाल दराने विकला गेला. ज्वारीस 4,400 रुपये, मक्याला 1,700 रुपये, बाजरीस 3,200 रुपये तर मूग व मसूरलाही मध्यम स्वरूपाचे दर मिळाले.
बुधवारच्या बाजार व्यवहारातून एकूण 7 कोटी 95 लाख 91 हजार 51 रुपये उलाढाल झाली. आवक व भाव स्थिर राहिल्यास आगामी काळात शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल.