नऊ दिवसांच्या उपचारानंतर मनोज जरांगे आज (दि.३) आंतरवाली सराटीत दाखल झाले. Pudhari Photo
जालना

आरक्षण न देता निवडणुका लावल्यास...; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लावू नये, अशी मोठी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. अर्थात त्यांनी अजून त्यांचे पत्ते उघडले नाहीत. लोकसभेचा दाखला देत त्यांनी राज्य सरकारला विधानसभेतील परिणामाचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. लोकसभेच्या वेळेस सांगितले होते आणि आताही सांगत आहे. मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करा, आरक्षण न देता निवडणुका लावल्यास सरकारला पश्चाताप होईल, असा इशारा जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी उपोषण सोडले होते. 25 सप्टेंबर रोजी त्यांनी समाजाच्या आग्रहास्त्व उपोषण सोडले. त्यानंतर छत्रपती संभाजी नगर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. नऊ दिवसाच्या उपचारानंतर ते आज (दि.३) आंतरवाली सराटीत दाखल झाले. यावेळेस त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

तुम्ही कितीही वर्गवारी तयार करा, पण विधानसभेत हेडमास्तर मराठा समाजच असेल, असे त्यांनी राज्य सरकारला बजावले. नारायण गडावरील दसरा मेळाव्याला राज्यभरातून मराठा समाजाने यावे, जे दुसरे मिळावे घेत आहेत. त्यांच्या एसटी रिकाम्या जाऊ द्या. मराठा समाजाची इच्छा होती, की एक तरी मराठा समाजाचा दसरा मेळावा व्हावा. आम्हाला राजकारण करायचे नाही, आमच्या मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करा, असे ते (Manoj Jarange) म्हणाले.

निवडणुकीपूर्वी मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. त्यांनी भाजपमधील मराठा नेत्यांना यावर विचार करून फडणवीस यांना याविषयीचा निर्णय घ्यायला लावावा. नाहीतर माझा नाईलाज आहे. फडणवीस यांना समजून सांगा. मराठ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय निवडणूक घेऊ नका, असा इशारा त्यांनी दिला. मराठ्यांना डावलू नका. मागण्या मान्य केल्या नाही, तर सुपडा साफ होईल, असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT