वडीगोद्री : जलसंपदा मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठ्यांचे सर्वाधिक वाटोळे केले आहे. त्यांनी गोड गोड बोलून आमचे वर्ष वाया घालविले. फडणवीस यांचे गुणगाण गाणे आणि शरद पवारांनी काहीच केले नाही, असे म्हणण्यापलीकडे त्यांनी काही काम केले नाही, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली.
विखे यांनी केले. त्यावर जरांगे यांच्या उपोषणाचा मंगळवारी अकरावा दिवस होता. जरांगे यांच्याशी सरकारी शिष्टमंडळ चर्चा करणार नाही, असे वक्तव्य संताप व्यक्त करताना अरांगे यांनी विखे यांच्या सात पिढ्या राजकारणात असल्या तरी त्यांना उखडून फेकण्याचा इशारा दिला. सरकार म्हणते आहे की आमच्याकडे पर्याय नाही. कुणबी प्रमाणपत्र रद्द करणे, बावनकुळेंचे ऐकणे हेच पर्याय आहेत का? सातारा संस्थानचे गॅझेट, हैदराबादप्रमाणे नोंदी याविषयाबाबत अनुकूल निर्णय झाले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या काळात आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण मिळाले, विखे-फडणवीसांनी काय केले? असा सवाल त्यांनी विचारला.
वैयक्तिक मंत्रिपदावर असताना तुम्हाला कुणी काही बोलणार नाही. तुमच्याकडे जोपर्यंत मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळचा शिक्का आहे, तोपर्यंत तुम्हाला मराठ्यांचे कामे करावे लागणार आहे. तुम्ही सपशेल अपयशी ठरला आणि तुम्ही मराठ्यांशी दगाफटका केला. आम्ही अंतरवालीत तुम्हाला बोलावित नाही, असे ते म्हणाले.
मुंबईवर ठाम
मला सांगितले होते की, विखे-पाटील दगाबाज आहेत. विखे सारखे उपसमितीचे अध्यक्ष असले तर मराठ्यांचे वाटोळेच होणार. विखेंना यापासून पळ काढता येणार नाही. देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण देत नाही. ते काही करत नाहीत फक्त दिखावा आहे, मला जेलमध्ये टाकायचे तर टाका. १२ तारखेला बैठक होणार असून, मुंबईला जाणार हे नक्की आहे, असे जरांगे यांनी सांगितले.