जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व फळांची आवक वाढत आहे. बाजार समितीने जाहीर केलेल्या दरपत्रकानुसार विविध शेतमालाच्या दरात चढ-उतार पहायला मिळत आहे. अद्रकचे भाव कमाल १६ हजार रुपये प्रतिक्विंटल असून कांद्याला कमाल ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहेत.
बाजार समितीच्या दरपत्रकानुसार अद्रकची आवक १५.२ क्विंटल असुन भाव किमान २ हजार ८००, कमाल १६ हजार आहेत. सरासरी भाव ९ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. लसण कमाल १४ हजार व सरासरी ७ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचे भाव आहेत.
कांद्याची आवक २३.४ क्विंटल असून भाव १ हजार, कमाल ४ हजार ५०० आणि सरासरी २ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. बटाट्याची आवक ४९.६ क्विंटल असून भाव किमान ३००, कमाल १ हजार ३०० व सरासरी ७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.
भाजीपाल्यात हिरवी मिरचीला कमाल १,५०० रुपये, टोमॅटोला १ हजार, गवारला ४ हजार, कारल्याला २ हजार ५००, भोपळ्याला ३ हजार, फुलकोबीला १ हजार ५०० आणि मका २ हजार ३०० रुपये असे प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाले. कोथिंबिरीला कमाल १५० रुपये जुडी, मेथीला २५०, पालकाला २००, शेपूला १५० आणि पुदिन्याला ४०० रुपये जुडीपर्यंत दर नोंदविण्यात आला.
फळभाज्या व भाजीपाल्याच्या दरात आवक आणि मागणीनुसार दररोज बदल होत असल्याचे चित्र असून, शेतमाल बाजारात आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बाजारभावाची माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भाजीपाल्याचे ठळक बाजारभाव
अद्रक : १६,००० -९,५०० प्रति
क्विंटल, लसूण : १४,०००-
७,३००, कांदा : ४,५००-२,४००, गवार : ४,००० -२,५००, भोपळा : ३,०००-
२,०००, कारले : २,५००-
२,०००, मका : २,३०० -
१,५००, हिरवी मिरची : १,५००
-१,०००, बटाटा : १,३०० -
७००, टोमॅटो : १,००० -७५०