The sanitation workers' salaries have been delayed for four months
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चार महिन्यांपासून वेतन रखडल्याने संतप्त स्वच्छतादूतांनी अखेर राज्यव्यापी संप पुकारला असून, बुधवारी (दि.४) पासून धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाचा परिणाम पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या कामांवर होत असून, अनेक ठिकाणी कामकाज ठप्प झाले आहे.
यामध्ये राज्यातून जवळपास ३०० स्वच्छतादूतांचा सामावेश असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.
सर्वांगीण स्वच्छता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी अभियानाचा गाभा मानला जातो. गेली दोन दशके राज्यातील गावागावांत स्वच्छतेचा जनजागृतीचा संदेश देत हागणदारीमुक्त मोहीम यशस्वी करण्यात स्वच्छतादूतांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
नियमित सेवेत दहा वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण केलेल्या उच्चशिक्षित अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासन सेवेत सामावून घेण्याबाबत प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) सूचना दिल्या आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी न करता उलट चार महिन्यांपासून वेतन न दिल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य पाणी व