Beed News 'त्या' बाळाने घेतला जगाचा निरोप, बाळाच्या मृत्यूस जबाबदार कोण?  Pudhari File Photo
बीड

Beed News 'त्या' बाळाने घेतला जगाचा निरोप, बाळाच्या मृत्यूस जबाबदार कोण?

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील चार दिवसापूर्वी जन्मलेले ते बाळ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे.

पुढारी वृत्तसेवा

The baby, born four days ago, died at Swarati Hospital in Ambajogai

गोविंद खरटमोल

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा :

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील चार दिवसापूर्वी जन्मलेले ते बाळ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे. कारण ८ जुलै रोजी जन्मलेले बाळ अवघ्या काही तासातच डॉक्टरांनी मृत घोषित करून ते कपड्यात बांधून नातेवाईकांच्या ताब्यात दिले होते.

नातेवाईकानी देखील त्या बाळाचा अंत्यविधी आपल्या होळ या गावी करण्याच्यासाठी घेऊन गेले. अंत्यसंस्कारासाठी खड्डा खणत असतांना बाळाच्या आज्जीची त्याचे तोंड पाहण्याची इच्छा झाल्याने कपड्यात बांधलेले ते बाळ खोलून पाहिले असता त्याचा रडण्याचा आवाज ऐकू आला. तात्काळ बाळाच्या आजोबांनी बाळास परत अंबाजोगाई येथील स्वाराती येथे दाखल केले. डॉक्टरांनी त्या बाळास अतिदक्षता विभागात दाखल केले.

उपचारादरम्यान आज त्या दुर्दैवी बाळाने अखेर जगाचा निरोप घेतला. या दुर्दैवी तथा दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र या बाळाच्या असल्यामुळे अधिकच अशक्त असलेल्या बाळाने या अतिदक्षता मृत्यूस जवाबदार कोण हा मोठा व निरुत्तरीत प्रश्न निर्माण झाला आहे. त्या बाळास व त्याच्या पालकास न्याय मिळेल का असा प्रश्न देखील नागरिकांतून विचारला जात आहे.

होळ येथील बालिका घुगे या महिलेच्या बाळाचा जन्म अवघ्या सातव्या महिन्यात झालेला विभागातील उपचारांना प्रतिसाद न देता अखेर काल ११ जुलै रात्री अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. या बाळाच्या जन्माने व निधनाने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती शास्त्र विभाग व बाल रोग विभागावर प्रश्न चिन्ह निर्माण करून ठेवले आहे. जिवंत असलेल्या बाळास मृत घोषित करणा-या डॉक्टरांचा तपास लागण्यापूर्वीच या बाळाने अखेरचा श्वास घेतला असल्यामुळे आता नेमका या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला आहे हा ही प्रश्न निर्माण केला आहे?

चौकशी समितीच्या अहवाल केंव्हा येणार?

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागाच्या बाल रोग विभागाच्या अंतररुग्ण कक्ष विभागात घडलेल्या या लांच्छनास्पद घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. जिवंत असलेल्या बालकास मृत घोषित करणा-या डॉक्टरांच्याहलगर्जीपणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे यांनी तातडीने पाच सदस्यीय समिती नियुक्त करून स्त्री रोग विभागाचे प्रमुख यांचे कडून या संपूर्ण घटनेचा मागितलेला लेखी अहवाल अजून तरी आला नसून येणार तो अहवाल नेमका कोणाच्या बाजूने येणार का डॉक्टर बांधवाना पाठीशी घालणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT