मराठवाडा

औरंगाबाद : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा ओढणीने घोटला गळा

backup backup

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : अनोळखी व्यक्तीशी फोनवर बोलल्याचा चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा खून केला. प्रथम ओढणीने फाशी दिली, नंतर उशीने तोंड दाबून निर्घूण खून केला. भानुदासनगर मधील गल्ली क्र. चार मध्ये 30 मे रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली.

मधुरा बालाजी लोणीकर (22), असे मयत महिलेचे नाव आहे. तिला अडीच ते तीन वर्षांचा मुलगा आहे. बालाजी वैजयंतराव लोणीकर (30) हा आरोपी पती असून तो स्वतः जवाहरनगर ठाण्यात हजर झाला. आठ दिवसांपासून मधुरा आणि बालाजी यांच्यात वाद सुरू होते. बालाजी हा मधुरावर संशय घ्यायचा. यावेळी त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाला चॉकलेट आणायला पाठवून देऊन तिची हत्या केली.

 सासूला देखील बालाजी यानेच फोन करून खुनाची माहिती दिली. जवाहर नगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT