Kolhapur News | राधानगरी धरणात १६.३७ टक्के तर तुळशी धरणात ९.३७ टक्के अतिरिक्त पाणीसाठा File Photo
कोल्हापूर

Kolhapur News | राधानगरी, तुळशी धरणात गतवर्षीपेक्षा अतिरिक्त पाणीसाठा

पाटबंधारे विभागाचे पाणीसाठा जून पर्यंत पुरविण्याचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Radhanagari dam water level

राशिवडे : कोल्हापूर जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या राधानगरी तालुक्यातील राधानगरी, तुळशी धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत राधानगरी धरणामध्ये १६.३७ टक्के तर तुळशी धरणामध्ये ९.३८ टक्के अतिरिक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पाटबंधारे विभागाने उपलब्ध पाणीसाठा जून पर्यंत पुरविण्याचे अचूक नियोजन केले आहे.

राधानगरी, तुळशी धरणातुन जिल्ह्याला सिंचनासह पिण्यासाठी पाणीपुरठा केला जातो. आज अखेर राधानगरी धरणामध्ये ४९.३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी हा साठा ३२.९३ टक्के होता. तर तुळशी धरणामध्ये आज अखेर ५८.८३ टक्के साठा शिल्लक असुन गतवर्षी हा साठा ४९.५६ टक्के इतका होता. काळम्मावाडी धरणामध्ये आज अखेर २२.३३ टक्के पाणीसाठा असुन गतवर्षी २२.०२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. राधानगरी धरणामध्ये १६.३७ टक्के तर तुळशी धरणामध्ये ९.३७ टक्के अतिरिक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे अचूक नियोजन केले असून जून पर्यंत सिंचनासह पिण्यासाठी पाणी शिल्लक राहील, असे नियोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT