पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण ९९ टक्के भरले आहे.  (Pudhari Photo)
कोल्हापूर

Radhanagari Dam | राधानगरी धरण ९९ टक्के भरले; स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Kolhapur Rain | सध्या धरणातून विजगृहासाठी १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पुढारी वृत्तसेवा
नंदू गुरव

Radhanagari Dam water level

राधानगरी: राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणीपातळी ९९ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणाची पूर्ण क्षमतेची पातळी ३४७.५० फूट असून, सध्याची पातळी ३४६.९० फूट आहे. म्हणजे केवळ अर्धा फूट पाणी कमी आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आज (दि.२५) रात्री उशिरा किंवा शनिवारी सकाळपर्यंत धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या धरणातून विजगृहासाठी १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवाजे उघडल्यास विसर्गात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे भोगावती नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

पावसाचा जोर कायम

शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत ६५ मिमी, तर दुपारी चार वाजेपर्यंतच्या १० तासांत ३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जूनपासून आतापर्यंत एकूण ३०८३ मिमी पाऊस झाला आहे. धरणात सध्या ८.२४ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

नागरिकांसाठी प्रशासनाचा इशारा

धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने आणि संभाव्य विसर्ग वाढीमुळे नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरणाचे दरवाजे कधीही उघडले जाऊ शकतात.

पावसाचा जोर आणि धरणातील वाढती पाणीपातळी लक्षात घेता, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही तासांत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT