कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राजाराम बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आहे. राजाराम बंधारा येथे आज (शनिवार) सकाळी आठ वाजता पाणी पातळी १७ फुटांवर होती. बंधाऱ्यावरून पंचगंगेचे पाणी वाहत असताना त्यातूनच वाहनधारक मार्ग काढत होते.
जून महिना संपत आला तरी अजुनही पावसाने जोर धरलेला नाही. शहर आणि परिसरात दिवसभरात हलक्या सरी कोसळत त आहेत. दरम्यान शुक्रवारी रात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्यात हवामान ढगाळ झाले आहे. तसेच अधुन-मधून कोसळणाऱ्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र शेतीच्या कामासाठी बळीराजाला अजुनही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.