Kolhapur Ratnagiri Highway Car Truck Crash
विशाळगड : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर वारूळ (ता. शाहूवाडी) येथे ट्रक आणि कार यांच्यात सोमवारी (दि.२५) भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून, जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोल्हापूरकडून रत्नागिरी महामार्गावर ट्रक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला.
अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमी हे सातारा जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून, पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.