कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ तावडे हॉटेल चौकात पुलाखाली साधारणतः चार फूट पाणी असल्याने आज (रविवार) सकाळी गांधीनगर पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ता बंद केला होता.
मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने व पाणी थोडे खाली आल्याने सकाळी ११ वाजता दुचाकी वगळता चारचाकी वाहने व अवजड वाहनांना एकेरी वाहतूक कोल्हापूरच्या दिशेने सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता तावडे हॉटेल येथून चारचाकी व अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू झालेली आहे.