महापुराच्या पाण्याला उग्र वास व काळा तवंग आला आहे.  
कोल्हापूर

कोल्हापूर : महापुराच्या पाण्यात सोडले काळेकुट्ट रासायनमिश्रित पाणी

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : शिरढोण, टाकवडे (ता.शिरोळ) नदीपात्रात ऐन महापुरातही गुरूवारी (दि.१) काळेकुट्ट रसायनमिश्रित उग्र वासाचे सांडपाणी सोडण्यात आले. त्यामुळे शिरढोण पंचगंगा पुलाच्या नदीपात्रातील व साचलेल्या महापुराच्या पाण्याला उग्र वास व काळा तवंग आला आहे. महापुराच्या पाण्यामुळे आधीच त्रस्त असणाऱ्या नागरिकांना प्रदूषित पाण्यामुळे मरणयातना भोगाव्या लागत असल्याचा संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे.

महापुरामुळे नदीकाठावरील अनेक कुटुंबे स्थलांतरित झाले आहेत. हजारो हेक्टर शेतातील पिके पाण्याखाली आहेत. अशातच हे रसायनमिश्रित सांडपाणी आल्याने काठावरील ऊस पिकांना मोठा फटका बसला आहे. महापुराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याचा आरोप लोक करत आहेत.

शिरढोण, टाकवडे, नांदणी-तेरवाड बंधारा याठिकाणी पंचगंगा नदीपात्र व साचलेल्या पुराच्या पाण्याला उग्र वास येत असून नदीपात्रात मध्यभागी महापुराच्या पाण्याला लाल तर पात्राच्या दोन्ही बाजूला काळा तवंग वाहताना दिसत आहे. त्यामुळे महापुराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रसायनमिश्रित सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT