नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मांगूर फाटा येथे उभारण्यात येणारा उड्डाणपूल हा भरीव स्वरुपाचा न होता तो पिलर घालून उभारण्यात यावा, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले. Samarjit Singh Ghatge
याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या सचिवांना आवश्यक निर्देश दिले आहेत. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास समरजीतसिंह घाटगे यांनी व्यक्त केला. Samarjit Singh Ghatge
दरम्यान, कोल्हापुर जिल्ह्यातील कागलमधील उड्डाणपूलप्रमाणे मांगूरच्या उड्डाणपूलाबाबतही लक्ष घालावे, अशी मागणी गावकऱ्यांची होती. तसे आश्वासन मी त्यांना दिले होते. त्यानुसार नितीन गडकरींची भेट घेतली, असे समरजीतसिंह घाटगे म्हणाले. मांगूर फाटा येथे होत असलेला उड्डाणपूल भराव टाकून तयार केल्यास आजुबाजुच्या परिसराला महापूरासारख्या आपत्तीचा सामना करावा लागू शकतो. कागल तालुक्यातील वेदगंगा नदीकाठावरील २५ ते ३० गावांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. या गोष्टी होऊ नयेत, म्हणून यासंबंधी जातीने लक्ष घालणार असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा