कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा गांधीनगरसह 13 गावांच्या सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेच्या 344 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबतचा शासन आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला असल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.
सुरुवातीला 20 गावांसाठी या पाणी योजनेचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, काही गावांनी या योजनेत सहभागी होण्यास नकार दिल्याने गांधीनगर सह 13 गावांसाठी पुढील 30 वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून ही सुधारित नळपाणी पुरवठा योजना तयार केली. या योजनेसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, सचिव संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरू ठेवला होता. या योजनेचा लाभ गांधीनगर, वळिवडे, गडमुडशिंगी, उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कणेरी, कळंबे तर्फ ठाणे, न्यू वाडदे, गोकुळ शिरगाव, कंदलगाव आदी गावांना होणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत ही योजना जिल्हा परिषदेने ताब्यात घ्यावयाची आहे, असे आमदार पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा